राज ठाकरेंची महायुतीला गरज नाही- आठवले

महायुतीला राज ठाकरेंची गरज नसल्याचं रामदास आठवले म्हणाले. राज ठाकरे यांची निवडणुकीत हवा गेली असून त्यांचे स्वप्न भंग झालं असल्याची टीका त्यांनी केली आहे.
Published by :
Team Lokshahi

रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना महायुतीसोबत घेण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, "महायुतीसोबत राज ठाकरे यांना घेतल्याने काही फायदा नाही." त्यांनी पुढे सांगितले की, "आपण असताना महायुतीला राज ठाकरे यांची गरज नसल्याचे स्पष्ट आहे." रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्या निवडणुकीतील पराभवावर टिप्पणी केली आहे. "राज ठाकरे यांना वाटत होते की, त्यांच्याशिवाय सत्ता येणार नाही, मात्र त्यांचे स्वप्न भंग झालं आहे," अशी टीका केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com