रावसाहेब दानवेंचा मोठा दावा, भाजपला निवडून आणण्यासाठी जलील यांना तिकीट द्यावचं लागेल

रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने विरोधकांना आयताच मुद्दा मिळण्याची शक्यता आहे.
Published by :
Team Lokshahi

छत्रपती संभाजीनगर: केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने विरोधकांना आयताच मुद्दा मिळण्याची शक्यता आहे. सोमवारी जिल्हा विकास समन्वय विकास व सनियंत्रण समितीच्या बैठकीत रावसाहेब दानवे यांनी राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उचावणारं वक्तव्य केलं आहे. भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्हाला इम्तियाज जलीलला उभं करावं लागतं, असं दानवे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात गदारोळ निर्माण झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com