Road Work : निवडणूक आचारसंहितेमुळे मुंबईतील रस्त्यांची कामं रखडली

निवडणूक आचारसंहितेमुळे मुंबईतील रस्त्यांची कामं रखडली. 400 किमीच्या रस्त्यांसाठीच्या निविदांबाबत प्रशासनाकडून अद्याप निर्णय नाही.
Published by :
Dhanshree Shintre

निवडणूक आचारसंहितेमुळे मुंबईतील रस्त्यांची कामं रखडली. 400 किमीच्या रस्त्यांसाठीच्या निविदांबाबत प्रशासनाकडून अद्याप निर्णय नाही. महापालिकेने नव्याने हजारो कोटींच्या नव्या कामांसाठी मागवलेल्या निविदांना 15 कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला आहे. मात्र त्याचा निर्णय आचारसंहिता संपल्यावर म्हणजेच जूनमध्ये होणार असल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे कंत्राटदारनिश्चिती आणि कार्यादेश प्रक्रिया आचारसंहिता मागे घेतल्यानंतरच पूर्ण केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पावसाळ्याचे चार महिने काम सुरूच होऊ शकणार नसल्यामुळे ही कामं आता थेट ऑक्टोबरमध्येच सुरू होतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com