Uday Samant on Abhishek Ghosalkar : घोसाळकर गोळीबार प्रकरणावरुन सामंतांनी विरोधकांना घेतलं फैलावर

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. मॉरिसला मोठं करण्याचं काम 'सामना'ने केलं, दोघांची मिटींग का झाली? कशासाठी झाली? असा सवाल उदय सामंत यांनी उपस्थित केलाय.
Published by :
Team Lokshahi

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. मॉरिसला मोठं करण्याचं काम 'सामना'ने केलं, दोघांची मिटींग का झाली? कशासाठी झाली? असा सवाल उदय सामंत यांनी उपस्थित केला आहे.

दोघांना तडजोड करण्यास कुणी सांगितलं? असाही सवाल मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यी एकनाथ शिंदेंना त्या प्रकरणामध्ये ओढायचं, मुख्यमंत्र्यी म्हणून महाराष्ट्रात चांगलं काम करत असताना, लोक त्यांच्या बाजूने आकर्षक होत असताना, कुठचा तरी एखादा प्रसंग धरून त्यांना बदनाम करायचं, ही गोष्ट खरच दुर्दैवी आहे. आजपर्यंत 'सामना' या दैनिकातून मॉरिस नोरान्हो याचे उदात्तीकरण करण्यात आले. त्यामुळे मॉरिसचं उदात्तीकरण कोण करत होतं?, त्याला मोठं कोण करत होतं? हे तुम्हला कळलं असेल. राज्यात कुठलीही घटना घडली की त्यासाठी एकनाथ शिंदे यांना जबाबदार धरणे चूक आहे, असे उदय सामंत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com