Sanjay Raut : जोपर्यंत महाराष्ट्रात फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठी माणसाला सुख, शांतता लाभणार नाही

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Published by :
Siddhi Naringrekar

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, ही भाजपची कारस्थानं असतात. याला राजकारणातला फडणवीस टच म्हणतात. जोपर्यंत महाराष्ट्रात फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाहीत.

त्याच्यामुळे महाराष्ट्र सुखात, शांततेत नांदवायचा असेल तर या महाराष्ट्रात आम्हाला सत्तांतर घडवावं लागेल. या सगळ्यांना हा जो कचरा आहे. या सगळ्यांनी केलेल्या गंभीर आर्थिक गुन्ह्याबद्दल आणि सत्तेच्या गैरवापराबद्दल खटले दाखल करावे लागतील. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com