पंतप्रधान मोदी साहेब तुम्ही दिलेल्या आश्वासनाचं काय झालं? दाभडीत झळकले 'चाय पे चर्चा'चे बॅनर

यवतमाळच्या दाभडीत 'चाय पे चर्चा'चे बॅनर झळकले. पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा यवतमाळमध्ये येणार आहेत.
Published by :
Team Lokshahi

यवतमाळच्या दाभडीत 'चाय पे चर्चा'चे बॅनर झळकले. पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा यवतमाळमध्ये येणार आहेत. शेतकऱ्यांनी आयोजित केली आठवणीतील 'चाय पे चर्चा' अशे बॅनर लावले आहेत. 20 मार्च 2014 रोजी नरेंद्र मोदीं यांनी एक कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना विविध प्रकारचे आश्वासन दिले होते.

20 मार्च 2014 रोजी नरेंद्र मोदींनी केलेल्या आश्वासनांची आठवण करुन देताना 'आठवणीतील चाय पे चर्चा' अश्या आशाचे बॅनर यवतमाळमधील शेतकऱ्यांनी लावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळच्या तिसऱ्यांदा दौऱ्यावर येत असल्याने दाभडी या गावात हे बॅनर लावण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com