Operation Sindoor : "ही तर सुरुवात, दहशदवाद्यांचं मुळ नष्ट करा"; मोने कुटुंबियांचे भावनिक आवाहन
22 एप्रिल रोजी पहलगामध्ये झालेल्या भ्याड दहशदवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणावरील लोकांचा मृत्यू झाला. त्यात डोंबिवलीतले अतुल मोने देखील होते, त्यांचा देखील या दहशदवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता. पहलगाममधील हल्ल्यावर प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी 7 मेला पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (पीओजेके) मधील नऊ दहशतवादी छावण्यांवर हल्ला करून ' ऑपरेशन सिंदूर ' सुरू केले.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये तीन प्रमुख दहशतवादी ठार झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. बहावलपूर येथील हल्ल्यात मसूद अझहर, मुरिदके येथील हल्ल्यात हाफिज सईद आणि सियालकोटमध्ये सलाहुद्दीनला ठार करण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे. त्याचसोबत भारताच्या वायुदलाच्या जवानांनी पाकिस्तानमधील दहशतवादी स्थळ भिंबर, कोटली, सरजाल सियालकोट, मेहमूना जोया, मरकज् तैबा मुरीदके, मरकज् सुभान अल्लाह बहावलपूरसह 9 ठिकाणी दहशतवादी तळं उद्धवस्त करण्यात यश मिळवलं आहे.
याचपार्श्वभूमीवर पहलगाममधील दहशदवादी हल्ल्यातील मृत अतुल मोने यांच्या कुटुंबियांनी ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली आहे. "जो एअरस्ट्राईक झाला तो चांगला झाला, भारत सरकार आणि सैन्याचे आभार, त्यांनी ही सुरुवात केली आहे, आता भारतीय सैन्याने दहशदवाद्यांचं मुळ नष्ट कराव अशी माझी इच्छा आहे. हा हल्ला म्हणजे 26 बलिदांनाना श्रद्धांजली असल्याचं" अतुल मोने यांच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे. तसेच याबद्दल भारत सरकार आणि सैन्याचे अतुल मोनेंच्या कुटुंबियांनी आभार मानले आहेत.