Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update : राज्यातील सर्व जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी होणार

27 सप्टेंबर ते 29 सप्टेंबरपर्यंत राज्यात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • राज्यातील सर्व जिल्ह्यातील पावसाचा जोर आजपासून कमी होणार

  • 27 सप्टेंबर ते 29 सप्टेंबरपर्यंत राज्यात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता

  • 30 सप्टेंबरनंतर पावसाचा जोर कमी होणार असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे

(Maharashtra Rain Update ) राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झालं आहे.

वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह सुरू असलेला मुसळधार पाऊस असाच सुरू राहिल्यास राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. यातच राज्यातील सर्व जिल्ह्यातील पावसाचा जोर आता कमी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

पुणे, मुंबईसह, मराठवाडा आणि राज्यातील सर्व जिल्ह्यातील पावसाचा जोर होणार आजपासून कमी होणार असून 27 सप्टेंबर ते 29 सप्टेंबरपर्यंत राज्यात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. 30 सप्टेंबरनंतर पावसाचा जोर कमी होणार असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

राज्यातील जिल्ह्यांना आज कुठल्याही प्रकारचा अलर्ट नसल्याची माहिती मिळत असून काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पडू शकत्ता असे सांगण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com