plane taking of image 
Uncategorized

2 वर्षांपासून बंद असलेली आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा पूर्ववत होणार

Published by : Vikrant Shinde

आज दोन वर्षांच्या कालावधीनंतर भारताने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाव्हायरस (Covid-19) या संपूर्ण जगात पसरलेल्या साथीच्या आजारामुळे थांबविण्यात आलेल्या परदेशातील उड्डाणे 27 मार्चपासून पून्हा सुरू होतील.

"जगभरात वाढलेली लसीकरण कव्हरेज ओळखल्यानंतर आणि भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर, भारत सरकारने 27.03.2022 पासून, म्हणजे ग्रीष्मकालीन वेळापत्रक 2022 पासून भारतात/पासून अनुसूचित व्यावसायिक आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे," असे सांगून नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय विमाने बंद केली होती .

आता जुलै 2020 पासून भारत आणि 37 देशांदरम्यान विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू आहेत. बबल व्यवस्थेमुळे एअरलाइन्सच्या ऑपरेशन्स आणि त्यांच्या नफ्याला धक्का बसला आहे.

विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितले की, आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्सना आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल. त्यामूळे 27 मार्च 2022 पासून बंद असलेली आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरू होईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा