India

ऑक्सिजन अभावी मृत्यू प्रकरण; केंद्र सरकारने राज्याकडे मागितली आकडेवारी!

Published by : Lokshahi News

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही, अशी माहिती केंद्र सरकारने दिल्यानंतर वादाला फोडणी मिळाली आहे. त्यानंतर राज्याने आकडेवारी दिली नसल्याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिलं होतं.

"ऑक्सिजन तुटवड्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी अहवालात दिलेली नाही. आरोग्य हा राज्याचा विषय आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश रोज आकडे केंद्र सरकारला देत असतं. तीच आकडेवारी केंद्र सरकार देत असतं.", अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून जोरदार टीका करण्यात आली होती.

आता केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेल्या लोकांची आकडेवारी मागितली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा