देश-विदेश

Ceasefire : "युद्ध म्हणजे सिनेमा नाही...", माजी लष्कर अधिकारी मनोज नरवणे यांचं वक्तव्य

युद्धाची गंभीरता: मनोज नरवणे यांचा इशारा

Published by : Shamal Sawant

सध्या सर्वत्र भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' ही मोहीम राबवली. यामध्ये भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळाला उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि भारतातील नागरी वस्ती लक्ष्य करण्यास सुरुवात केली. भारत-पाकिस्तान यांच्यामधील तणाव वाढण्यास सुरुवात झाली. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शस्त्रसंधी लागू झाली आहे. मात्र त्यावरुन अनेक प्रश्नदेखील उपस्थित होत आहेत. यावरुन माजी लष्कर अधिकारी मनोज नरवणे यांनी भाष्य केले आहे.

नरवणे म्हणाले की, "जेव्हा युद्ध पुकारले जाते तेव्हा फक्त संहार आणि विनाश होतो. त्याचा एक खर्च असतो. जर आपण आठवडे आणि महिने चालणाऱ्या दीर्घ, दीर्घ संघर्षात अडकलो, तर प्रत्येक नुकसानाचा तात्काळ अर्थ काय असेल आणि युद्धाच्या शेवटी जेव्हा तुम्हाला या सर्व नुकसानांची भरपाई करावी लागेल तेव्हा त्याचा काय अर्थ होईल याची कल्पना करा".

पुढे नरवणे म्हणाले की, "जर तुम्ही तथ्ये आणि आकडेवारी पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की नुकसान खूप मोठे किंवा असह्य होण्यापूर्वी हा निर्णय घेणे शहाणपणाचे आहे. मला वाटते की या हल्ल्यांद्वारे आम्ही पाकिस्तानला हे सिद्ध केले आहे की आम्ही त्यांच्या दहशतवादी तळांवरच नव्हे तर त्यांच्या हद्दीत खोलवर असलेल्या त्यांच्या विमानतळावरही हल्ला केला आहे, त्यांना याची किंमत खूप जास्त मोजावी लागेल. युद्ध हे रोमँटिक नसते. हा बॉलिवूड चित्रपट नाहीये. ही एक अतिशय गंभीर बाब आहे आणि युद्ध किंवा हिंसाचार हा शेवटचा पर्याय असला पाहिजे" .

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द