देश-विदेश

PM Narendra Modi On Delhi Election Result: दिल्लीकरांना दिली गॅरंटी! दिल्लीतील विजयावर पंतप्रधान मोदींचं ट्विट

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय! पंतप्रधान मोदींनी दिली गॅरंटी - दिल्लीचा चौफेर विकास आणि जीवनमान सुधारण्यासाठी कोणतीच कसर सोडणार नाही.

Published by : Prachi Nate

आज 8 फेब्रुवारीला या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. सुरुवातीच्या आकडेवारीपासूनच, भाजप आघाडीवर असल्याचे दिसून येत होते. दिल्ली विधानसभेचे 70 जागांचे प्राथमिक कल हाती आले. यामध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसून आलं. 2025 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप वरचढ ठरला आहे. याचपार्श्वभूमिवर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या निकालावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्लीकरांना दिली गॅरंटी! “दिल्लीचा चौफेर विकास आणि इथल्या लोकांचं जीवनमान सुधारण्यात आम्ही कोणतीच कसर सोडणार नाही ही आमची गॅरंटी आहे. यासोबतच आम्ही हेही निश्चित करू की विकसित भारताच्या निर्मितीमध्ये दिल्लीची महत्त्वाची भूमिका असेल”, अशी प्रतिक्रिया दिल्लीच्या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.

पंतप्रधान मोदींचे ट्वीट

मनुष्यबळ सर्वोपरि! विकास जिंकला, सुशासन जिंकला. दिल्लीतील सर्व बंधू भगिनींना

@BJP4India

ऐतिहासिक विजयाला सलाम आणि अभिनंदन! तुम्ही दिलेल्या आशीर्वाद आणि पाठिंब्याबद्दल मी मनापासून तुमचा ऋणी आहे. दिल्लीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येथील लोकांचे जीवन चांगले करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, ही आमची रणनीती आहे. त्याचबरोबर भारताचा विकास होईल, दिल्ली महत्त्वाची भूमिका बजावेल, याचीही काळजी घेऊ. चोळण्यात

@BJP4India

तुमचे दिवसभराचे काम अतिशय गौरवास्पद आहे, मुख्य म्हणजे या देशासाठी केळी आहे. आम्ही आणखी ताकदीने येऊन आमच्या दिल्लीकरांची सेवा करू.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द