'तुझ्या जीव रंगला' या मालिकेला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. हार्दिक जोशी-अक्षया देवधर आज(२ डिसेंबर) लग्नबंधनात अडकले आहेत. अक्षया-हार्दिकचा शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडला. मित्रपरिवार, कुटुंबीय व नातेवाईकांच्या उपस्थितीत अक्षया-हार्दिकने विवाहगाठ बांधली. लग्नासाठी अक्षयाने खास हातमागावर विणलेली लाल रंगाची नऊवारी पैठणी साडी नेसली होती तर धोतरमध्ये हार्दिकचा लूक होता.
त्यांचा सोशल मिडियावर सप्तपदीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सगळीकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या मालिकेतील जोडगोळी 'राणा-दा' आणि 'अंजलीबाई' यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केलीच, परंतु मालिकेत त्यांच्या प्रेमाची केमेस्ट्री जशी आपल्याला पाहायला मिळाली, तसेच ते खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले. मालिकेदरम्यान त्यांच्या प्रेमाचे सुर जुळले. मालिकेत एकत्र काम करत असताना त्यांच्या प्रेमाची सुरवात झाली. त्यानंतर 2 मे २०२२ ला दोघांनी साखरपुडा करून प्रेक्षकांना आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.