मनोरंजन

आलिया भट्टने एकाच आठवड्यात केले दोनदा लग्न; करण जोहरने केला धक्कादायक खुलासा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम आणि प्रशंसा मिळाली आहे. अलीकडेच, करणने त्याच्या चित्रपटाची सक्सेस पार्टी साजरी केली आणि चित्रपटाच्या कुडमयी गाण्याचे संपूर्ण व्हर्जन लाँच केले. चित्रपटातील कुडमयी हे गाणे रॉकी आणि राणी यांच्या प्रेमकथेचा हॅप्पी एंडीग करते. त्यांचे लग्न शेवटी गाण्यात दाखवले आहे.

कुडमयी या गाण्याबद्दल सांगताना करण जोहर म्हणाला की, मेकिंग दरम्यान आलियाने आठवड्यातून दोनदा लग्न केले. आलियाने रणबीर कपूरसोबत लग्नाच्या चार दिवसांनंतर हे गाणे शूट केले आहे. राणीच्या हातावरची मेहंदी ही आलियाच्या लग्नातील मेहंदी होती. शूटसाठी तिने मेंहदीचा रंग फक्त गडद केला आहे. म्हणजे रॉकी आणि राणीच्या लग्नाचा हा सीन आलियाच्या लग्नानंतर काही दिवसांनी शूट करण्यात आला होता. तसेच, करणने चित्रपटात पूर्ण गाणे समाविष्ट करण्याची योजना आखली होती. परंतु, ते रनटाइमच्या पलीकडे जात होते. त्यामुळेच क्रेडीटमध्ये कुडमाईचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, रॉकी आणि राणीची प्रेमकहाणी घेऊन करण जोहर 7 वर्षांनी दिग्दर्शक म्हणून परतला. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट तसेच धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत आणि प्रेक्षकांकडून तसेच सेलिब्रिटींकडूनही या चित्रपटाला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने जगभरात १०० कोटींचा टप्पा ओलांडला असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल