मनोरंजन

'अंगूरी भाभी' लग्नाच्या 19 वर्षांनंतर पतीपासून विभक्त झाली, म्हणाली काही नुकसान...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

'भाभीजी घर पर है' मधील अंगूरी भाभी उर्फ ​​शुभांगी अत्रे हिने लग्नाच्या 19 वर्षांनंतर पती पियुष पुरेसोबतचे नाते संपवले आहे. तिने याला एका मुलाखतीदरम्यान दुजोरा दिला असून लग्नाबद्दल तिची व्यथा मांडली आहे. शुभांगी अत्रे आणि पियुष मागील एक वर्षापासून वेगळे राहत होते. त्यांना एक मुलगी 18 वर्षाची मुलगी देखील आहे. दोघेही वेगळे झाले असतील, पण मुलीचे सहपालक आहेत.

शुभांगीने सांगितले की, आम्ही एक वर्ष एकत्र राहत नाही. पियुष आणि मी आमचे लग्न शेवटपर्यंत वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. परस्पर आदर, विश्वास आणि मैत्री हा विवाहाचा पाया असतो. आमच्या वैवाहिक जीवनात अनेक समस्या होत्या. आम्हाला समजले की आमचे मतभेद सोडवू शकत नाही. त्यामुळे आम्ही एकमेकांना स्पेस देण्याचे ठरवले आणि आमच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि करिअरवर लक्ष केंद्रित केले.

माझे कुटुंब हे माझे पहिले प्राधान्य होते आणि आमचे कुटुंब आमच्या सभोवताली असावे अशी आमची इच्छा आहे, परंतु काही नुकसान दुरुस्त केले जाऊ शकत नाही. इतक्या वर्षांचे नाते तुटले की त्याचा मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तुमच्यावर परिणाम होतो. माझ्यावरही परिणाम झाला, परंतु आम्हाला हे पाऊल उचलावे लागले आणि मी ते मान्य करते. मानसिक स्थिरता सर्वात महत्वाची आहे, असे शुभांगीने सांगितले आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...