मनोरंजन

हिरो बनण्यासाठी सलमान खानच्या बहिणीशी लग्न? आयुषने दिले उत्तर

अर्पिताशी लग्न केल्यानंतर आयुषला अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने ट्रोल केले जाते.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सलमान खानची बहीण अर्पिता खानचे आयुष शर्मासोबत लग्न झाले होते. अर्पिताशी लग्न केल्यानंतर आयुषला अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने ट्रोल केले जाते. आयुषने अर्पिताशी लग्न केले, कारण त्याला अभिनेता व्हायचे होते, असेही अनेकवेळा सांगण्यात आले. या ट्रोलिंगला त्याने एका मुलाखतीत आयुषने प्रत्युत्तर दिले आहे.

आयुष शर्मा म्हणतो, अर्पिता एक मजबूत, आत्मविश्वासू आणि अद्भुत महिला आहे. तिच्यासारखा जोडीदार मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. ती जशी आहे तशी ती स्वतःला स्वीकारते. अनेक लोक म्हणतात की मी पैशासाठी आणि अभिनेता बनण्यासाठी तिच्याशी लग्न केले. पण मी त्याच्यावर प्रेम करतो म्हणून त्याच्याशी लग्न केले. अर्पिता आणि आमच्या कुटुंबाला हे माहीत आहे, असे त्याने म्हंटले आहे.

काही लोक मला सुट्टीवर जाण्यासाठी ट्रोल देखील करतात. सलमान खानच्या पैशाने मी सुट्ट्या एन्जॉय करतो, असे त्यांचे मत आहे. माझ्या लग्नासाठी सलमान खानने मला रोल्स रॉइस गिफ्ट केल्याचेही मी अनेक ठिकाणी वाचले आहे. पण मला आश्चर्य वाटते की रोल्स रॉयस कुठे आहे? ट्रोलर्स त्याला आणि अर्पिताला काहीही म्हणत असले तरी अशा गोष्टींमुळे माझ्या आयुष्यात काहीच फरक पडणार नाही, असेही आयुष शर्माने म्हंटले

आयुष शर्माचे 18 नोव्हेंबर 2014 रोजी अर्पिताशी लग्न झाले होते. आयुष आणि अर्पिताचे एक मुलगा आणि मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. अर्पिताशी लग्न झाल्यानंतर चार वर्षांनी आयुषने 'लवयात्री' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास जादू दाखवू शकला नाही. यानंतर आयुष सलमान खानसोबत 'अंतिम' चित्रपटामध्येही दिसला होता. लवकरच आयुष शर्मा रुस्लान या चित्रपटात दिसणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."