मनोरंजन

'Dhoom 4' : रणबीर कपूर धमाल करण्यास सज्ज, अयान मुखर्जी दिग्दर्शित करणार! सविस्तर जाणून घ्या

रणबीरचा धूम 4 मध्ये नवा अंदाज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

Published by : Shamal Sawant

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि अॅक्शनने भरलेल्या फ्रँचायझींपैकी एक असलेली ‘धूम’ मालिका आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरली आहे. कारण, ‘धूम 4’ मध्ये अभिनेता रणबीर कपूर एका पूर्णपणे नवीन लूकमध्ये झळकणार असून, यासाठी त्याने तयारीलाही सुरुवात केली आहे.

रणबीरचा ‘धूम’ अवतार

रिपोर्ट्सनुसार, धूम 4 मध्ये रणबीरचे पात्र हे त्याच्या आधीच्या भूमिकांपेक्षा खूप वेगळं आणि दमदार असणार आहे. त्याचा लूक आणि व्यक्तिरेखा खास त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी असून, निर्माते त्यावर बारीक लक्ष ठेवून काम करत आहेत. हा चित्रपट आतापर्यंतच्या सर्व धूम चित्रपटांपेक्षा भव्य आणि वेगळा असणार असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाचे निर्माता आदित्य चोप्रा सध्या लेखक श्रीधर राघवन यांच्या सहकार्याने पटकथेवर काम करत आहेत. धूम 4 हा केवळ पुढचा भाग नसून, तो संपूर्ण फ्रँचायझीसाठी रीबूट म्हणून तयार केला जात आहे. त्यामुळे कथा, अॅक्शन, संगीत आणि लूक सर्वच नवीन आणि आधुनिक युगाशी सुसंगत असतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील अॅक्शन सीन जागतिक पातळीवरील अॅक्शन चित्रपटांना टक्कर देतील.

चित्रपटाचं शूटिंग 2026 च्या उन्हाळ्यात सुरू होणार आहे. सोशल मीडियावर #Dhoom4WithRanbir आणि #RanbirKapoor ट्रेंड होताना दिसत आहेत. अनेकांनी "आता खरी धूम सुरू होईल!" अशा कमेंट्स केल्या आहेत. काही जणांनी हृतिक रोशनलाही परत यावं अशी मागणी केली आहे, कारण धूम 2 मधील त्याचा करिष्मा अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai BEST Election Results : ठाकरे बंधुनी ही संधी देखील गमावली! बेस्ट पतपेढी निवडणुकीत एकही जागा नाही

Latest Marathi News Update live : हार्बर मार्ग 15-20, मध्य रेल्वे 20-25 तर पश्चिम रेल्वे 30-35 मिनिटांनी उशिराने धावत आहे

Local Train Updates : आज देखील मुंबई लोकल वेळापत्रक कोलमडले! हार्बर, मध्य आणि पश्चिम मार्गावर 30–35 मिनिटांनी उशीरा ट्रेन

Devendra Fadnavis On Konkan Railway : मुख्यमंत्र्यांकडून चाकरमान्यांसाठी खूशखबर! आता गणपतीला कोकणात जाण आणखी सोप; पण कसं?