Manoj Bajpayee Team Lokshahi
मनोरंजन

Manoj Bajpayee : बॉलिवूडच्या फ्लॉप चित्रपटाबद्दल बोलताना मनोज म्हणाला....

बॉलीवूडमध्ये सध्याची मंदी ही केवळ एक वाईट अवस्था आहे. आणि यापासून हिंदी चित्रपटसृष्टी लवकरच सावरेलं असा विश्वास अभिनेता मनोज बाजपेयी(Manoj Bajpayee) यांनी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षभरात चित्रपटसृष्टीचे अनेक नुकसान झाले असून केवळ काही चित्रपटांना यश मिळाले आहे

Published by : prashantpawar1

बॉलीवूडमध्ये सध्याची मंदी ही केवळ एक वाईट अवस्था आहे. आणि यापासून हिंदी चित्रपटसृष्टी लवकरच सावरेलं असा विश्वास अभिनेता मनोज बाजपेयी(Manoj Bajpayee) यांनी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षभरात चित्रपटसृष्टीचे अनेक नुकसान झाले असून केवळ काही चित्रपटांना यश मिळाले आहे. आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' आणि अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन' सारख्या चित्रपटांना मध्यम कामगिरीने बॉलिवूडला अंतर्मुख होऊन आपला मार्ग सुधारण्याची गरज आहे की नाही याबद्दल बरीच चर्चा निर्माण झाली आहे. बॉलीवूड बबलशी बोलताना बाजपेयी म्हणाले की कधीकधी आपल्यावर वाईट काळाचा खूप प्रभाव पडतो. पण सिनेमा कधीच मरू शकत नाही आणि हिंदी सिनेमा कधीच मरणार नाही. सध्या स्थिती निश्चितपणे दुरुस्त होईल आणि पुन्हा सामान्य स्वरूपात परत येईल.

हिंदी चित्रपटसृष्टीचे काही रोमांचक नवीन टप्पे असतील." बॉलीवूडमध्ये काही उणीव आहे का असे विचारले असता त्याने यावर उत्तर दिले की "नाही. कारण आम्हाला कशाचीही कमतरता नाही. आम्ही इतकी दशके मनोरंजन करत आहोत. फक्त यामध्ये काही गोष्टींना सुधारण्याची गरज आहे. लोक पुरेसे स्मार्ट आहेत. काही नवीन दिशा आणि उत्तम कलाकार देखील येत आहेत. मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सर्वात वाईट टप्प्याबद्दल सांगितलं. ते म्हणाले की जेव्हा मी दिल्लीहून मुंबईत आलो तेव्हा मुंबईत आल्यानंतर मला काम मिळाले नाही. आणि मी नेहमी माझ्या पुढच्या जेवणाच्या शोधात असायचो. तो अत्यंत आव्हानात्मक आणि माझ्यासाठी कठीण असा काळ होता. माझी तब्येत ठीक नव्हती आणि माझ्या खिशात पैसे देखील नव्हते. ती चार-पाच वर्षे मी माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट वर्षे मानतो. मी याला नेहमीच दुःखद कथा बनवू शकतो. परंतु मी माझ्या कारकिर्दीच्या प्रत्येक टप्प्याचा आनंद घेतला आहे असं देखील त्याने सांगितलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा