मनोरंजन

टायगर श्रॉफच्या‘वंदे मातरम्’गाण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक

Published by : Lokshahi News

अभिनेता टायगर श्रॉफने त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या फिटनेस, डान्स आणि स्टंटने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. टायगर श्रॉफच्या डान्स आणि फिटनेसचं कायमचं चाहत्यांकडून आणि बॉलिवूड सेलिब्रिटींकडून कौतुक केलं जातं. मात्र यावेळी टायगरच्या एका नव्या टॅलेंटचं सर्वत्र कौतुक होतयं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी देखील टायगरच्या या नव्या कौशल्याचं कौतुक केलं आहे.

भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत टायगर श्रॉफचं 'वंदे मातरम्'हे गाणं चाहत्यांच्या भेटीला आलं. टायगर श्रॉफने गायलेल्या या सुरेल गाण्यात त्याच्या आवाजाच्या जादूसोबतच त्याचा दमदार डान्स पाहायला मिळतोय. स्वातंत्र्यदिनी टायगरने हे गाणं ट्विटरवर शेअर केलं होतं. एक पोस्ट लिहित त्याने नरेंद्र मोदींना देखील या पोस्टमध्ये टॅग केलं होतं. या पोस्टमध्ये तो म्हणाला , "वंदे मातरम्…हे केवळ शब्द नाहीत, तर भावना आहेत. अशा भावना ज्या आपल्याला आपल्या राष्ट्रासाठी योगदान देण्यासाठी प्रेरित करतात. या स्वातंत्र्यदिनी १३० कोटी भारतीयांसाठी एक छोटासा प्रयत्न"

टायगर श्रॉफच्या या ट्वीटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेचच प्रतिक्रिया देत त्याचं कौतुक केलंय. मोदी ट्वीटमध्ये म्हणाले, "क्रिऐटिव्ह प्रयत्न. वंदे मातरम् बद्दल तू जे बोललास त्याच्याशी पूर्णपणे सहमत" असं मोदी म्हणाले.

तर मोदींची ही प्रतिक्रिया पाहून टायगर श्रॉफला प्रचंड आनंद झाला आहे. "तुमच्याकडून असं कौतुक होणं हे माझ्यासाठी भाग्य आहे. मी अत्यंत भारावून गेलो असून कृतज्ञ आहे" असं म्हणत टायगरने आनंद व्यक्त करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळलेले; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला

Devendra Fadanvis Podcast : 'एक नवी सुरुवात करतोय...'; मुख्यमंत्री पॉडकास्टच्या माध्यमातून साधणार संवाद, पंढरपुरातून केली घोषणा