मनोरंजन

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या तिसऱ्या पर्वात ‘ती’ परत येतेय…

Published by : Lokshahi News

झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले' मालिकेच्या तिसऱ्या पर्वाने देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. पहिल्या दोन पर्वासारखीच पसंती प्रेक्षक आता तिसऱ्या पर्वालाही देत असल्याचं दिसून येतंय. कारण दोन भागांची सांगड घालून मालिकेत अनेक रहस्य उलगडली जात आहे.

नाईकांच्या वाडयातल्या शुभ कार्यापासून झालेली सुरु झालेली कथा वाड्यात वावरणाऱ्या अण्णा शेवंतांच्या अतृप्त आत्म्या पर्यंत येऊन पाहोचली आहे. माईने आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी वाडा शेवंतांच्या ताब्यात दिला असला तरी वाड्याबद्दल असलेली तिची आपुलकी आणि मुलांवर असलेला जिव्हाळा यामुळे माईचे प्रयत्न नक्कीच थांबणार नाहीत.

तिची पुण्याई तिच्यासोबत असली तरी एक अशी व्यक्ती हवी आहे जी ह्या दुष्ट शक्तीवर अंकुश ठेवेल. ही व्यक्ती आहे वच्छी.. होय 'वच्छी परत येतेय'. वाड्याचा जिला हव्यास होता ती वच्छी नेमकं काय करणार? खरच माईच्या पाठीशी उभी राहणार का? शोभा, काशीच्या मृत्यूचा सूड घेणार का? तुमच्या मनातल्या अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं घेऊन 'वच्छी परत येतेय.'वच्छीच्या येण्याने एक रंजक वळण पाहायला मालिकेत बघायला मिळणार आहे.. त्यामुळे वच्छी आता काय करामती करणार याची सगळ्यांना उत्सुकता असणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Crop Insurance Update : शेतकऱ्यांच्या लबाडीसाठी त्यांना थेट काळ्या यादीत स्थान; पीकविमा योजनेसंदर्भात नवीन घोषणा

Chandrakant Khaire On Nishikant Dubey : निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरून चंद्रकांत खैरे संतापले, म्हणाले, "आमच्या पैशांवर तुमचं झारखंड आणि..."

Nishikant Dubey : "कोण कुत्रा आणि कोण वाघ..." मुंबईत हिंदी भाषिक वादावरून निशिकांत दुबे यांची ठाकरे बंधूंवर जहरी टीका

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, जनसुरक्षा समिती प्रमुख तसेच महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक