झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले' ही रहस्यमयी मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली होती. या मालिकेतील अण्णा, शेवंता, माई, पासून सुसल्या आणि पांडूपर्यंत सर्वच कलाकारांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. मालिकेला मिळालेलं प्रचंड यश आणि चाहत्यांकडून होतं असलेली मागणी यामुळे मालिकेचे 3 भाग आले आहेत.
काही महिन्यांपूर्वीच मालिकेचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. लॉकडाऊनमुळे शुटींगवर निर्बंध आले होते. मात्र आता लवकरच मालिकेचं शुटींग सुरु होणार आहे. आणि त्यामुळेच मालिकेचे नवे एपिसोड आपल्या भेटीला येणार आहेत.'रात्रीस खेळ चाले' मालिकेचा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता असणारा प्रल्हाद कुरतडकरनं याबद्दलची माहिती दिली आहे.