Salman Khan
Salman Khan Team Lokshahi
मनोरंजन

Salman Khan : सलमानला मारण्यासाठी घरापर्यंत पोहचला होता मारेकरी

Published by : shweta walge

सलमान खानच्या (Salman Khan) हत्येचा कट रचल्या प्रकरणाचे रोज नवनवीन खुलासे होत आहेत. वास्तविक,सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईने (Lawrence Bishnoi) जीवे मारण्याची धमकी दिली होती, शिवाय त्याच्या सलमानच्या हत्येसाठी मारेकऱ्याला मुंबईत (Mumbai) पाठवले होते.पण तो हल्ला करू शकला नाही. संपत नेहरा (Sampat Nehra) असे त्या मारेकऱ्याचे नाव असून तो लॉरेन्स बिश्नोईचा उजवा हात असल्याचे सांगितले जाते. हे खुलासे लॉरेन्स बिश्नोईचा खास सिद्धेश हिरामण कांबळे (Siddhesh Hiraman Kamble) उर्फ महाकाल याने केले आहेत.

सलमान खानला मारण्याची योजना

2021 मध्ये लॉरेन्सने कबूल केले की, त्याने सलमानच्या हत्येची जबाबदारी राजस्थानचा (Rajasthan) गँगस्टर संपत नेहराला दिली होती. योजनेनुसार संपत नेहरा मुंबईला पोहोचला. काही दिवस संपतने सलमान खानच्या मुंबईतील घरावर लक्ष ठेवले आणि नंतर संधी मिळाल्यावर सलमान खानवर गोळी झाडण्याचा प्लॅन केला.पण संपतकडे पिस्तूल होती आणि त्यामुळे त्याला दूरवरून नेम धरता येत नव्हता. मग त्यांने त्यांच्या गावातील एका दिनेश फौजीशी (army) संपर्क साधून आरके स्प्रिंग रायफल (RK spring rifle) मिळवली. पण रायफल संपतपर्यंत पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी त्याचा शोध काढला आणि त्याला अटक केली.

कोण आहे संपत नेहरा?

संपत नेहरा हा लॉरेन्स बिश्नोईचा उजवा हात आहे. चार वर्षांपूर्वी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. लॉरेन्स टोळीचा गुंड संपत नेहरा हा चंदिगड पोलिसातील निवृत्त सहायक उपनिरीक्षक रामचंदर यांचा मुलगा आहे. एवढेच नाही तर संपत हा राष्ट्रीय स्तरावरील डेकॅथलॉन (Decathlon) (हर्डल रेस) रौप्य पदक विजेता देखील आहे.

संपत नेहरा कसा झाला गुंड ?

अभ्यासादरम्यान संपत नेहरा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात आला. बिश्नोईने संपत नेहराचे इतके ब्रेनवॉश (Brainwash) केले की त्याला गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारण्यास भाग पाडले. आणि हळूहळू तो गुंड लॉरेन्सचा उजवा हात बनला. संपत हा लॉरेन्स गँगचा शार्प शूटर (Sharp shooter) देखील आहे.

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल