मनोरंजन

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

तेजस्विनी पंडितने राज ठाकरे यांच्यासाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे. 'आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू' असे ती म्हणाली आहे.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्र २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान पार पडले. तर विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागला. या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव करून महायुतीने विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीसह मनसेचा देखील या निवडणूकीत पराभव झाला त्यामुळे राज ठाकरेंना या निवडणुकीत यश मिळाले नाही. याचपार्श्वभूमीवर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर पोस्ट करत तिची प्रतिक्रिया मांडली आहे. तेजस्विनीने राज ठाकरेंसाठी ही भावनिक पोस्ट केली आहे.

याआधी मतदानाच्या दिवसा आधी तेजस्विनीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती ज्यात ती म्हणाली होती की,

"महाराष्ट्रात गरीबापासून श्रीमंतापर्यंत, लहानापासून मोठ्यापर्यंत , कुणावरही कठीण संकट आलं आणि त्यावर मार्ग सापडत नसेल तर, सगळे शिवतीर्थावर धाव घेतात आणि मार्ग सापडतोच. राज ठाकरे खंबीरपणे आपल्या मागे उभे आहेत हा विश्वास आपल्याला आहे. आता आपण खंबीरपणे राज साहेबांच्या मागे उभे राहूया. 20 तारखेचा सूर्योदय हा नवनिर्माणाचा असावा त्यासाठी रेल्वे इंजिन च बटण दाबून मनसेच्या उमदेवारांना विजयी करूया …"

विधानसभा निकालादरम्यान तेजस्विनी ट्वीट करत म्हणाली की,

"विजयी उमेदवारांचं अभिनंदन ! कोण? कसं ? आणि काहीजण का नाही हे अनुत्तरीत राहिल, त्यांच्या micro management ला १००/१०० पण तरीही राजसाहेब ठाकरे आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू "

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा