India

Farm Laws Repeal | …त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा- प्रियांका गांधी

Published by : Lokshahi News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात कृषी कायदा ही तिन्ही विधेयक मागे घेण्याची घोषणा केली. हे कायदे मागे घेण्याची प्रक्रिया संसदेच्या अधिवेशनात सुरू होईल, पंतप्रधानांनी म्हटले आहे. या घोषणेनंतर आता देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत, शेतकरी दिल्लीच्या सींमावर आंदोलन करत राहिले त्यासंदर्भात शेतकऱ्यांचं अभिनंदन करते, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

शेतकऱ्यांना राजकीय नेत्यांनी आंदोलनजीवी म्हटलं, शेतकऱ्यांना गुंड म्हटलं गेलं. नरेंद्र मोदी आंदोलनजीवी म्हणाले. शेतकऱ्यांना अटक केलं जातं होतं. आज तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा. या सरकारला देशात शेतकऱ्यांशिवाय कोणीही मोठं नाही हे समजलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी या आंदोलनादरम्यान जीव गमावला त्यांना आदरांजली आहे. केंद्रीय मंत्र्याला बरखास्त केलं पाहिजे. संपूर्ण देशात शेतकऱ्यांचा आवाज आहे त्या सोबत आपल्याला उभं राहावं लागेल. रासायनिक खतं मिळवताना रांगेत शेतकऱ्यांनी जीव गमावला आहे, असं प्रियांका गांधी म्हणाल्या. सर्व राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला. शेतकरी दिल्लीच्या सींमावर आंदोलन करत राहिले त्यासंदर्भात शेतकऱ्यांचं अभिनंदन करते, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. मात्र, मोदी सरकारची नियत सर्वांना माहीत आहे. त्यामुळे मोदींच्या निर्णयावर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केला. मोदी सरकार अध्यादेश का आणत नाही? निवडणुका लागल्यावरच अध्यादेश काढणार का? असा सवालही प्रियंका यांनी केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक