India

मध्य प्रदेशात पुराचा कहर; NDRF, SDRF सहीत लष्कराच्या चार कॉलमची मागणी

Published by : Lokshahi News

मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय. इथल्या जवळपास २०० गावांना पुरानं मोडीत जवळपास काढलंय तर २२ गावं पाण्याखाली आहेत. प्रशासनाचे परिस्थितीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांचे प्रयत्न सुरू असतानाच आता भारतीय लष्करालाही पाचारण करण्यात आल.

आमचे दोन मंत्री शिवपुरीमध्ये कंट्रोल रुम बनवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. भारतीय लष्कराच्या चार कॉलमची मागणी आहे. एका कॉलममध्ये लष्कराचे ८० जवान सहभागी असतात. लष्कर पाठवणं योग्य राहील, असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलंय.

शिवपुरी जिल्ह्यात गेल्या काही तासांत ८०० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलीय. २६ जुलै २००५ रोजी मुंबईला पावसानं दणका दिला होता तेव्हा ९४४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती, यावरून परिस्थितीचा अंदाज येऊ शकेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा