अध्यात्म-भविष्य

गणपतीच्या पूजेत तुळशीचा का समावेश करत नाही? जाणून घ्या कथा

9 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवात लोक बाप्पाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

ganesh Chaturthi 2023 : 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवात लोक बाप्पाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. असे मानले जाते की ज्याच्यावर बाप्पाची कृपा होते त्याची सर्व दुःख दूर होतात आणि धन, संपत्ती, शांती आणि समृद्धी वाढते. गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते. जरी श्रीगणेशाला सर्व प्रकारची फळे आणि फुले अर्पण केली जातात, तरी तुळशीच्या पानांचा वापर केला जात नाही. याच्याशी संबंधित एक अतिशय दृढ समज आहे.

गणेश पूजेत वापरू नका तुळस

बाप्पाची सर्व भक्त वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाचा गणेशोत्सव 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. आठवडाभर लोक त्याच्या पूजेत तल्लीन राहतील. बाप्पाला प्रामुख्याने अक्षता, फुले, दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात. पण चुकूनही पूजेत तुळशी अर्पण करू नये. खरं तर, पौराणिक हिंदू मान्यतेनुसार, तुळशीने गणेशाला शाप दिला होता.

पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान गणेश गंगा नदीच्या काठावर ध्यान करीत बसले होते. इतक्यात तुळशीदेवी तिथे आल्या आणि त्यांची नजर गणेशावर पडली. तुळशी देवींना गणपती आवडला आणि त्यांनी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. गणेशजींनी हा प्रस्ताव नाकारला. हे पाहून तुळशी देवींना राग आला आणि त्यांनी गणेशाला शाप दिला की त्याची दोन लग्ने होतील.

शिवपुराणानुसार भगवान गणेशाला रिद्धी आणि सिद्धी या दोन पत्नी होत्या. याशिवाय बाप्पाच्या शुभ आणि लाभ या दोन मुलांचाही उल्लेख आहे. या कारणास्तव, तेव्हापासून आजपर्यंत तुळशीचा वापर गणेशाच्या कोणत्याही पूजेत केला जात नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा