Vidhansabha Election

ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गणेश नाईक म्हणाले...

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ऐरोली मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गणेश नाईक म्हणाले की, आजवर 90सालापासून मी निवडून आलो. त्या पद्धतीचीच ही निवडणूक वाटते. याच्यापेक्षा काय फरक नाही. मला कुठल्याच पक्षाचे आव्हान वाटत नाही. महायुतीचे घटक, नेते लोक सगळ्यांना आदेश देतात की त्या ठिकाणी तुम्ही आपला युतीधर्म पाळा. आता काही लोकांना नसेल पटत तर त्यांनी नाही पाळावा. असे गणेश नाईक म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा