Vidhansabha Election

ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गणेश नाईक म्हणाले...

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ऐरोली मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गणेश नाईक म्हणाले की, आजवर 90सालापासून मी निवडून आलो. त्या पद्धतीचीच ही निवडणूक वाटते. याच्यापेक्षा काय फरक नाही. मला कुठल्याच पक्षाचे आव्हान वाटत नाही. महायुतीचे घटक, नेते लोक सगळ्यांना आदेश देतात की त्या ठिकाणी तुम्ही आपला युतीधर्म पाळा. आता काही लोकांना नसेल पटत तर त्यांनी नाही पाळावा. असे गणेश नाईक म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप