Vidhansabha Election

बोरिवली विधानसभा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर भाजपा नेते गोपाळ शेट्टी यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

बोरिवलीतून भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

बोरिवली विधानसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांची माघार

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

बोरिवली विधानसभा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर भाजपा नेते गोपाळ शेट्टी यांची प्रतिक्रिया

बोरिवलीतून भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे भाजपामध्ये बंडखोरी झाली आहे.

त्यानंतर त्यांची समजून काढण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरु होते. यातच आज भाजप नेते विनोद तावडे यांनी गोपाळ शेट्टी यांची भेट घेतली आणि समजूत काढली. त्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देत गोपाळ शेट्टी म्हणाले की, मला अनेक नेते समजावयाला आले. भेटायला आले. एकदा नाही तर अनेकवेळा आले. म्हणून मी आता माघार घेत आहे. माझा मुद्दा पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचलेला आहे. मी परत एकदा सांगतो. भविष्यात असा कुठेच बाहेरुन उमेदवार आणू नये या मताचा मी नाही. पक्ष शेवटी व्यक्तीपेक्षा मोठा असतो. व्यक्तीचे सर्वच म्हणणं ऐकून घेऊन पक्षाने ताबडतोप उत्तर द्यायला पाहिजे ही अपेक्षा गोपाळ शेट्टी यांची नाही आहे.

पक्षाकडे आपल्या भावना आपण मांडल्या आणि ज्या पक्षात आपण काम करतो त्या पक्षाला समजण्यासाठी खूप वेळ लागेल. असं मला वाटत नाही. पक्षाच्या कार्यपद्धतीवर मी बोललो नाही. मी पक्षाच्या नेत्यांवरती पण नाराज नाही आहे. परंतु पक्षात असे काही नेते आहेत जे अशाप्रकारचे उद्योग करत असतात. त्यांच्याकडूनही नकळत होत असेल. परंतु नकळत होत असलेल्या गोष्टी लक्षात आणून देणं हे पक्ष कार्यकर्त्यांचे काम आहे ते मी केलं. असे गोपाळ शेट्टी म्हणाले. असे गोपाळ शेट्टी म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी बेस्ट पतपेढी पराभवासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू