आरोग्य मंत्रा

चपातीला तूप लावून खाणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या...

आरोग्य तज्ज्ञांच्यामते चपातीवर तूप लावल्यास कोणतंही नुकसान होत नाही पण जास्त प्रमाणात तूप लावणं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं.

Published by : Team Lokshahi

चपातीला तूप लावून खाणं अनेकांना आजही आवडतं. चपातीची चव आणि सुंगधानं पोट भर जेवल्यासारखं वाटतं. काहीजण चपातीला तूप लावल्याशिवाय अजिबात खात नाहीत. तूप लावलेली चपाती कोणत्याही गोड पदार्थासह उत्तम लागते. अगदी चहाबरोबर लोक तूप लावलेली चपाती आवडीनं खातात. चहा चपाती खाण्याचे फायद्यांसह तोटेही आहेत.

चपातीवर तूप लावायला हवं की नाही?

आरोग्य तज्ज्ञांच्यामते चपातीवर तूप लावल्यास कोणतंही नुकसान होत नाही पण जास्त प्रमाणात तूप लावणं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं. तर काहीजणांसाठी फायदेशीर ठरतं. म्हणूनच चपातीला तूप लावून कोणी खावं आणि कोणी तूप न लावलेली चपाती खावी हे समजून घेणं महत्वाचं आहे.

प्रत्येक मानवी शरीराची स्वतःची क्षमता असते. तूप कोणाला फायदेशीर आणि कोणाला हानी पोहोचवते, त्या व्यक्तीचे आरोग्य जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. जर एखाद्याचे आरोग्य आधीच कमजोर असेल तर त्याला तुपाचा फायदा मिळत नाही. याउलट तूप कमी प्रमाणात खाल्ल्यास कोणतेही नुकसान होत नाही. चपात्यांवर थोडेसे तूप लावले तर नुकसान होत नाही.

वजन कमी करण्यासाठी तूप खायचं की नाही?

तज्ज्ञ सांगतात वजन कमी करण्यासाठीही तूप फायदेशीर आहे. अशा काही समजुती आहेत ज्यात असे मानले जाते की वजन कमी करण्यासाठी तूप फायदेशीर ठरू शकते. सकाळी लवकर तुपासह भाकरी खाल्ल्यास दिवसभर भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते. कारण चपातीवर तूप लावल्यानंतर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो आणि निरोगी कोलेस्ट्रॉलही वाढू शकते.

जास्त तूप लावल्यास काय होतं?

जास्त प्रमाणात तूप खाणे हानिकारक ठरू शकते. तुपाच्या सेवनाने हृदयाच्या आरोग्याचे नुकसान होते आणि कोलेस्ट्रॉल वाढते. तूप जास्त काळ जास्त तापमानात ठेवल्याने त्याची रचना बदलते आणि शरीरात फ्री रॅडिकल्स तयार होऊ लागतात. फ्री रॅडिकल्सची निर्मिती म्हणजे अनेक रोगांचे दार. म्हणूनच एक किंवा दोन चमच्यांपेक्षा जास्त तूप कधीही खाऊ नये.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा