Headline

हिंगोलीच्या काही भागात जोरदार पावसाला सुरुवात

Published by : Lokshahi News

आज ४ ऑक्टोबर राज्यातील औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हवामान विभागाने परतीच्या पावसाचा अंदाजदेखील व्यक्त केला आहे.

हिंगोली जिल्ह्यात हवामान खात्याने 3 ऑक्टोंबर ते 5 ऑक्टोंबरदरम्यान पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा हिंगोलीतील काही भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आता अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच पुन्हा एकदा पाऊस पडत असल्याने काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, हवामान विभागाने परतीच्या पावसाचा अंदाजदेखील व्यक्त केला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास 06 ऑक्टोबरला सुरु होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाचे दिल्ली येथील तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करून याविषयी माहिती दिली. मान्सूनचा परतीचा प्रवास वायव्य भारताच्या काही भागांतून सुरु होईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू