अध्यात्म-भविष्य

Guru Purnima 2023: गुरुपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' चुका

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Guru Purnima 2023: या वर्षी गुरुपौर्णिमा 3 जुलै रोजी सोमवारी साजरी केली जात आहे. गुरु पौर्णिमा हा एक महत्त्वाचा सण आहे, जो गुरुंची उपासना करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी समर्पित आहे. हा सण आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात.

गुरुपौर्णिमा हा सण महर्षी वेद व्यास यांची जयंती म्हणूनही साजरा केला जातो. कारण व्यासजींना आदिगुरू मानले जाते आणि त्यांनी महाभारताची रचना केली. आपल्यात गुरूला देवापेक्षा वरचा दर्जा देण्यात आला आहे. गुरूंचा आदर करणारी व्यक्ती नेहमीच यशस्वी असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुसमोर काही चुका करणे टाळावे. चला जाणून घेऊया गुरुपौर्णिमेला गुरूसमोर कोणत्या चुका करू नयेत.

- माणूस आयुष्यात कितीही यशस्वी झाला तरी त्याने गुरूंच्या आसनावर बसू नये. गुरु जर खुर्चीवर बसणार असतील तर त्या व्यक्तीने खुर्चीवर बसू नये. मात्र, गुरु जमिनीवर बसले असतील तर शिष्यही जमिनीवर बसू शकतो.

- भिंतीला किंवा इतर कोणत्याही गोष्टीला टेकून गुरुंसमोर बसू नका. तसेच गुरूंसमोर पाय पसरून बसू नका. असे करणे म्हणजे गुरूंचा अपमान करण्यासारखे आहे.

- तुमच्या गुरूंबद्दल कधीही वाईट बोलू नका. असे करणे महापाप मानले जाते. याउलट, जर दुसरा माणूस गुरूंचे वाईट करत असेल तर त्याला गप्प बसवा किंवा उठून तिथून निघून जा, कारण गुरूंच्या वाईट गोष्टी ऐकणे देखील पापासारखेच आहे.

- धनाच्या बाबतीत माणूस कितीही मोठा असला तरी त्याने गुरूंसमोर कधीही कीर्ती दाखवू नये. कारण गुरूंनी दिलेल्या ज्ञानानेच शिष्यांचे कल्याण होते. गुरुंच्या ज्ञानाची किंमत कोणत्याही संपत्तीने फेडता येत नाही.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...