India

भारत आणि चीन सीमावादावर समेट ; राजनाथ सिंह यांची राज्यसभेत घोषणा

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क

काही महिन्यांपासून भारत आणि चीनच्या सीमेवर चालत असलेल्या वाद चिघळत असतानाच भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये समेट झाली असून, परस्पर सहमतीने सैन्य मागे घेतले जात आहे, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत दिली. यावेळी भारताची एक इंच जमीनही कोणत्याही देशाला मिळू देणार नाही असे सूचक विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत केले आहे.

चीनबरोबर पेँगॉंगजवळील सैन्य तुकड्या दोन्ही देशांनी मागे घेण्याबाबत करार झाल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. चीनशी अनेक पातळ्यांवर चर्चा सुरू असून आपसातील सहकार्यानुसार सर्व निर्णय घेतले जातील. चीनशी बोलणी करताना भारताने काही मुद्दे अग्रक्रमाने ठेवले आहेत. त्यात एलएसीचा आदर दोन्ही देशांनी करावा, जैसे थे स्थितीत एका बाजूने बदल करू नये, सर्व समझोत्यांचं चीन आणि भारत दोन्ही देशांनी पालन करावं हे तीन मुद्दे आम्ही ठळकपणे मांडल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : शक्तीपीठ महामार्गाला शासनाची मान्यता प्रकल्प हाती घेण्यास, भूसंपादनासाठी शासनाची मान्यता

Mrunal Dhole Patil on Maratha-Kunbi :"ओबीसी आरक्षणातून मराठा-कुणबींना वगळा"; अभ्यासक मृणाल ढोले-पाटील यांची मागणी

UP Video Viral News : आकाशातून अचानक पैशांचा पाऊस! लोकांची झुंबड उडाली; झाड, रस्ता म्हणू नका पत्र्यावर चढून गोळा करू लागले नोटा

Manoj Jarange Patil : मुंबईकडे निघालेल्या मराठा आंदोलकाचा मृत्यू; जरांगेंच्या उपोषणापूर्वी दु:खद बातमी