Cyber Security 
Business | Career

Cyber Security: सरकारचा नवा नियम! मोबाईलमधून सिमकार्ड काढताच WhatsApp, Snapchatसह अनेक मेसेजिंग अ‍ॅप होणार बंद

Digital Safety India: भारत सरकारने सायबर सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, सर्व मेसेजिंग अ‍ॅप्स सक्रिय सिम कार्डशी जोडणे अनिवार्य केले आहे. सिम काढताच अ‍ॅप बंद होईल. हा नियम फेब्रुवारी २०२६ पासून देशभर लागू करण्यात येणार आहे.

Published by : Team Lokshahi
NEW RULE MESSAGING APPS

भारतामध्ये व्हॉट्अ‍ॅप आणि स्नेपचॅटसह विविध मेसेजिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता प्रचंड आहे आणि त्यांचे यूजर्स देखील मोठा आहे. या यूर्सचे फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्अ‍ॅप आणि टेलेग्राम वापरणाऱ्या अनेक लोकांना वारंवार लक्ष्य केले आहे.

NEW RULE MESSAGING APPS

भारत सरकारने सार्वजनि सुरक्षेसाठी हा नवा नियम लागू केला आहे. या निर्देशांनुसार WhatsApp, Telegram, Signal, Snapchatसह अनेक मेसेजिंग अ‍ॅप्स आता वैध भारतीय सिमशिवाय वापरता येणार नाहीत.

NEW RULE MESSAGING APPS

दूरसंचार विभागाने (DoT) दूरसंचार सायबरसुरक्षा सुधारणा नियम, २०२५ अंतर्गत नवीन तरतूद लागू केली असून, कंपन्यांना फक्त सक्रिय सिम कार्डधारकांना सेवा देण्याची अट घातली आहे.

NEW RULE MESSAGING APPS

मेसेजिंग अ‍ॅप्सना नवीन व्यवस्था करण्यासाठी ९० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सरकारने त्यांना दूरसंचार ओळखकर्त्यांच्या यादीत समाविष्ट करुन अ‍ॅप सक्रिय सिमशी जोडणे बंधनकारक केले आहे.

NEW RULE MESSAGING APPS

व्हॉट्सअ‍ॅप वेब यूजर्ससाठी नवे नियम लागू झाले आहेत. आता संगणकावरील खाते सहा तासांनी आपोआप लॉगआउट होईल आणि पुन्हा वापरासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल.

NEW RULE MESSAGING APPS

बहुतांश मेसेजिंग अ‍ॅप्समध्ये इंस्टॉल करताना मोबाइल नंबरची पडताळणी केली जाते, पण सिम काढल्यानंतरही अ‍ॅप चालू राहते. गुन्हेगार या त्रुटीचा फायदा घेऊन सायबर गैरकृत्ये करतात.

नवीन नियमानुसार मेसेजिंग अ‍ॅप्स वापरण्यासाठी सक्रिय सिम अनिवार्य असेल. फोनमधून सिम काढताच अ‍ॅप निष्क्रिय होईल. ही तरतूद फेब्रुवारी २०२६पासून लागू होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा