India

31 जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

Published by : Lokshahi News

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांनवर ३१ जुलै पर्यंत बंदी घातली आहे. नागरी विमानवाहतुक महासंचालयाने आंतरराष्ट्रीय उड्डानावरच्या बंदीला एका महीन्यासाठी वाढवले आहे.

मात्र, काही मोजक्या मार्गांवरील काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांना अपवादात्मक परिस्थितीत परवानगी दिली जाऊ शकते. २३ मार्च २०२०रोजी आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे रद्द करण्यात आली होती.

नागरी विमानवाहतुक महासंचालयाने ट्विटवर पोस्ट केलेल्या पत्रात असे सांगितले कि, ३१ जुलै २०२१ च्या रात्री ११:५९ वाजे पर्यंत आंतराष्ट्रीय प्रवासी वाहुतुकिवर बंदी कायम राहील. पण भारताने अनेक देशांशी हवाई बबल करार केला आहे. या करारनुसार भारताने विविध उड्डाने चालु ठेवली आहेत.

भारताने अमेरिका, ब्रिटन, संयुक्त अरब अमीरात, केनिया, भूटान आणि फ्रान्स सहित 27 देशांसोबत एअर बबल करार केला आहे. दोन देशांच्या दरम्यान एअर बबल पॅक्ट अंतर्गत त्यांच्या विमान कंपन्या त्यांच्या प्रदेशांदरम्यान विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवू शकतात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज