लाईफ स्टाइल

Banana Diet : डाएटचा हा नवीन ट्रेंड तुम्हाला माहीत आहे का?

केळी खाण्याबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत.

Published by : Shamal Sawant

आजकाल आरोग्याच्या बाबतीत प्रत्येक जण सजग झालेला बघायला मिळत आहे. धावपळीच्या काळात आरोग्याकडे लक्ष देणे काही वेळेस कठीण होते. मात्र तुम्ही जर योग्य आहार घेतल्यास त्याचे अनेक गुणकारी फायदे होऊ शकतात. अशावेळेस तुम्ही तुमच्या आहारात प्रोटिन, फायबर आणि कॅल्शियमचा समावेश केल्यास अधिक फायदे मिळतात. हे घटक फळांमध्येही असतात. त्यामुळे फळं खाणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

अनेकांना फळांमध्ये केळी खाणे अधिक आवडते. पण केळी खाण्याबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. पण केळी खाल्ल्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे सकळच्या नाश्त्यामध्ये केळी खायला अधिक पसंती देतात. पण यावरुनचं 'बनाना डाएट'ची संकल्पना समोर आली आहे. या आहारात, लोकांना नाश्त्यात फक्त केळी खावी लागतात आणि नंतर पाणी प्यावे लागते. लोक त्यांच्या क्षमतेनुसार नाश्त्यात 3-4 किंवा त्याहून अधिक केळी खाऊ शकतात. यानंतर, लोक सामान्यपणे दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण खाऊ शकतात, परंतु रात्री 8 नंतर काहीही खाण्यास मनाई आहे.

यामुळे खूप जड किंवा तेलकट अन्न खाणे टाळले जाते. या जपानी ब्रेकफास्टच्या आहाराचा ट्रेंड सध्या वाढताना दिसतो. आरोग्य तज्ञांच्या मते, सकाळचा केळीचा आहार आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. केळीमध्ये नैसर्गिक साखर, फायबर आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीरातील चयापचय क्रिया वाढते आणि कॅलरीज कमी होण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी प्रभावी मानले जाते.

(टीप : सदर माहिती आणि उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. लोकशाही मराठी याची पुष्टी करत नाही. उपायांचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. )

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Crime News : चितेगावमध्ये मियाँभाईच्या खुनाची उकल; सहा आरोपींना पोलीस कोठडी

Birthday Celebration : ऑफिसमध्ये वाढदिवस साजरा करताय ? मग थांबा ! सरकारने काढला नवा नियम

S. Jaishankar On Donald Trump : भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीवरून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे स्पष्ट विधान; ट्रम्प यांचा दावा पुन्हा फेटाळला

Cotton Market News : कापसाचा दर कमी होण्यासाठी शासन जबाबदार; नागपूर खंडपीठाचे सरकारवर कडक शब्दात ताशेरे