लाईफ स्टाइल

पावसाळ्यात गाडीने प्रवास करताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा

पावसाळ्यात आरोग्यासह गाडी चालवतांना देखील काळजी घेणे गरजेचे असते.

Published by : Siddhi Naringrekar

पावसाळ्यात आरोग्यासह गाडी चालवतांना देखील काळजी घेणे गरजेचे असते. पावसाळ्यात गाडी चालवताना ओला रस्ता यामुळे अनेक अडचणी येतात. तुमच्या गाडीच्या समोरची काच जर वायपर वापरून देखील स्वच्छ होत नसेल, तर अशा वेळी अपघाताचा धोका वाढतो.

पावसात गाडी चालवताना जर तुमचे ब्रेक आवाज करत असतील, किंवा ब्रेक पॅडल अधिक टाईट किंवा लूज असेल तर लवकरच नीट करुन घ्या. गाडीचे टायर तपासून घेणं गरजेचं आहे. बॅटरीला असलेल्या वायर लूज होण्याचाही धोका असतो. त्यामुळे, पावसात गाडी बाहेर काढण्यापूर्वी बॅटरी तपासून घ्यावी.

पावसाच्या पाण्यामुळे विंडस्क्रीनवर धुकं पडत आणि बाहेरचं दृश्य स्पष्टपणे दिसत नाही. ही समस्या टाळण्यासाठी एसी चालू ठेवावा. पावसाळ्यात गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. गाडी चालवताना आपल्याला लांबच्या गोष्टी दिसत नाहीत, अशा वेळी हेडलाईट्सचा वापर करावा.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange Patil : "मिळालेलं प्रमाणपत्र अंतरवालीत आणा, मला बघायचंय"; मराठवाड्यात वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रावर जरांगेंना संशय

Latest Marathi News Update live : उपेंद्र पावसकरला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टीका