ब्लॉग

होळी, धूलिवंदन, रंगपंचमी यातील फरक

Published by : Lokshahi News

शभम शिंदे: महाराष्ट्र हा संस्कृती, प्रथा, परंपरा आणि विविधतेने नटलेला आहे. नुकताच आपण सर्वांनी होळीचा सण साजरा केला. होळीच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र रंगात न्हाऊन निघाल्याचं आपण सर्वांनी पाहिलं. पण हा सगळा आनंद साजरा करताना होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी यातील फरक आपल्याला माहिती आहे का?

खरंतर महाराष्ट्रातील प्रत्येक भागात तेथील स्थानिक प्रथे-परंपरेनुसार होळी साजरी केली जाते. फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत हा रंगोत्सव साजरा केला जातो. कोकणात तर या उत्सवाला शिमगा असं म्हणतात. कोकणातील शिमगोत्सव म्हणजे कोकणी माणसासाठी अतिशय महत्वाचा सण. मुंबईत आणि बऱ्याच ठिकाणी होळीनंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाच्या दिवशी रंग खेळले जातात. मात्र रंग खेळण्याचा दिवस हा होळीनंतर पाचव्या दिवशीच असतो त्याला रंगपंचमी असं संबोधले जाते.

महाराष्ट्रातील आदिवासी भागात तेथील प्रथेपरंपरेनुसार होळीचा सण साजरा केला जातो तर महाराष्ट्रतील बंजारा समाजही त्यांच्या चालीरुढी जपत हा सण साजरा करतात. महाराष्ट्रात सर्वत्र होळीच्या सणाला पुरण पोळी बनवली जाते आणि त्याचा नैवद्य होळीला दाखवला जातो.

होळी, धूलिवंदन, रंगपंचमी यातील फरक तुम्हाला माहितीय का?

  • होळीच्या दिवशी होळी पेटूवून तिची पूजा करून पेटवली जाते. यादिवशी होळीला पुरण पोळीचा नैवद्य दाखवला जातो. होळी रचण्याची धामधूम 3 ते 4 दिवस आधीच सुरु असते.
  • तर धूलिवंदन म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाणारी होळीची कर. या दिवशी होळी जाळून उरलेली राख एकमेकांवर उधळली जाते आणि यासोबत संध्याकाळी गावातील प्रमुख भागात विविध वेशभूषा करून मुले, तरुण जमतात आणि त्यांची मिरवणूक काढली जाते त्याला वीराचा पाडवा असं म्हणतात.
  • आणि रंगपंचमी म्हणजे होळी नंतर पाचव्या दिवशी साजरा केला जाणारा सण. यादिवशी सामाजिक सलोखा जपत एकमेकांवर विविध रंगांची उधळण केली जाते. सर्वत्र कोरडे रंग, ओले रंग आणि पाणी देखील खेळले जाते या दिवशी होळीच्या सणाची सांगता होते.

मात्र महाराष्ट्र प्रत्येक भागात तेथील परंपरे नुसार होळीचा सण साजरा केला जातो. काही ठिकाणी 5 तर काही ठिकाणी 7 दिवसांचा हा सण उत्साहात साजरा केला जातो.

IPL 2024 : मुंबई इंडियन्सविरोधात मॅकगर्क-स्टब्सचा झंझावात! शेवटच्या चेंडूवर दिल्लीनं जिंकला रंगतदार सामना

भाजपने मुंबई उत्तर-मध्य लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "राजकारणातून..."

कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यातून PM मोदींचा 'मातोश्री'वर निशाणा; म्हणाले, आज बाळासाहेब असते, तर..."

उद्गीरमध्ये प्रियांका गांधींचा PM मोदींवर हल्लाबोल, म्हणाल्या; "पैशांच्या जोरावर महाराष्ट्रातील आमदारांना..."

Onion Export: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; केंद्राकडून कांदा निर्यातीला अखेर परवानगी