नाांदेडमधील अबजल येथे गोळीबाराची घटना घडल्याचे समोर आले होते. या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर, एकजण जखमी झाला होता. आरोपींचा खालसा दहशतवादी संघटनेशी संबध असल्याचा पोलिसांना संशय असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोळीबार करणाऱ्या दोघांना एटीएस पथकाकडून पंजाबमध्ये अटक करण्यात आली आहे.
नेमंक प्रकरण काय?
मिळलेल्या माहितीनुसार, 10 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास शहिदपुरा भागात रवींद्रसिंग राठोड आणि गुरमीतसिंग सेवालाल उभे असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात रवींद्रसिंघ राठोडचा जागीच मृत्यू झाला, तर गुरमीतसिंघ सेवालाल हा जखमी झाला होता. पोलिसांच्या तपासादरम्यान आरोपींचा खालसा दहशतवादी संघटनेशी संबध असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने पंजाबमध्ये धडक कारवाई करत मुख्यआरोपीला अटक केली असून, या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.