येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 30 डिसेंबरपर्यंत महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होते. आज 31 डिसेंबर रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. तर 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आता जोरदार तयारीला लागले असून सभांचे आयोजन करण्यात येत आहे.
(Kalyan - Dombivli) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. काल एबी फॉर्मचं वाटप करण्यात आले. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अनेकांना उमेदवारी नाकारल्याने इच्छुकांनी नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. कल्याण-डोंबिवलीत भाजपने विजयाचे खाते उघडल्याचे पाहायला मिळत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पॅनल क्रमांक 18 अ मध्ये भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी यांचा एकच अर्ज असून भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
(Ladki Bahin Yojana Ekyc ) 'लाडकी बहीण' योजनेतील ज्या महिलांनी केवायसी केली नाही आहे त्या महिलांना यापुढे लाडकी बहिण योजनेचे हप्ते मिळणार नाहीत. यासोबतच त्यांची नावे या योजनेतून बाद केली जाऊ शकतात. सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंत e-KYC अनिवार्य केले आहे. ज्या महिला या वेळेत e-KYC करणार नाही त्यांचा लाभ थांबणार आहे. लाडक्या बहिणींना दर महिना दीड हजार रुपये दिले जात होते. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींना ही रक्कम मिळत होती. मात्र सर्वच महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला पाहायला मिळत आहे.
देशातील ५० लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स यांचे लक्ष सध्या ८व्या वेतन आयोगावर केंद्रित झाले आहे. या संदर्भात केंद्र सरकारकडून मोठ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षाचा दिलासा मिळणार आहे. १ जानेवारी २०२६ पासून ८ वा वेतन आयोग (8th Pay Commission) प्रभावी होणार आहे. सरकारने यासाठी आठवा केंद्रीय वेतन आयोगाचे सदस्य नियुक्त केले आहेत. तरीही, आयोगाला लागू होण्याची अंतिम तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. वेतन आयोग लागू झाल्यानंतर वाढलेले पगार लगेच मिळणार नाही, परंतु आयोग लागू झाल्यापासूनचा एरिअर नक्की मिळणार आहे. तज्ज्ञांच्या मते, सरकार लवकरच वेतनवाढीची अधिकृत घोषणा करेल आणि एरिअर देण्याची प्रक्रिया सुरु होईल.
राज्य आणि देशातील हवामान सातत्याने बदलत आहे. देशाच्या काही भागात कडाक्याची थंडी, तर काही भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मॉन्सून संपून काही महिने झाले असले तरीही, काही भागांत पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. १ जानेवारी २०२६ रोजीही काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण 15 महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली, जालना, पिंपरी-चिंचवड, लातूर या शहरांमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे. अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. या सर्व ठिकाणी अत्यंत नाट्यमय अशा घडामोडी घडलेल्या बघायला मिळाल्या. पण अखेर शेवटपर्यंत दोन्ही पक्षांचं नेत्यांचं युतीबाबत एकमत होऊ शकलं नाही. त्यामुळे या 15 महापालिकांमध्ये युती तुटल्याचं सध्याचं चित्र आहे
Konkan Railway ) कोकण रेल्वे मार्गावर 30 दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. 1 ते 30 जानेवारी दरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) यार्डमधील दुरुस्ती व देखभालीचे काम हाती घेतल्याने कोकण रेल्वे मार्गावरील काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असून, आजपासून प्रत्येक उमेदवाराचा प्रचाराचा वेग मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी, माघारी आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर आता थेट मैदानातील राजकीय लढत सुरू झाली आहे. त्यामुळे आजपासून राज्यातील विविध शहरांमध्ये प्रचाराचा जोर स्पष्टपणे दिसून येणार आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये बंडखोरीचे सत्र जोरात सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ठाकरे ब्रँडच्या युतीपासून ते भाजप–शिंदे सेना युतीपर्यंत अनेक वॉर्डमध्ये अधिकृत उमेदवारांव्यतिरिक्त अपक्ष अर्ज दाखल झाल्याने राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया काल संपली असून, या निवडणुकीत २,५०१ पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मुंबईतील विविध विभागांमध्ये चांगलीच धावपळ पाहायला मिळाली.
( Delivery Boy ) डिलिव्हरी बॉय आज संपावर जाणार आहेत. 31 डिसेंबरला डिलिव्हरी बॉय संपावर जाणार असून विविध मागण्यांसाठी त्यांनी देशव्यापी संप पुकारला आहे. कामाची खालावलेली स्थिती, कमी होत जाणारी कमाई आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव या प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.
राज्याच्या प्रशासकीय आणि राजकीय दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आज दुपारी १२ वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार असून, बैठकीत राज्यातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी प्रचंड राजकीय ड्रामा पाहायला मिळाला.