OPERATION HEROF 2.0: BLA ATTACK IN BALOCHISTAN LEAVES 150 SOLDIERS DEAD AND BLOODSHED 
देश-विदेश

Operation Herof 2.0: पाकिस्तानमधील गंभीर दहशतवाद; बलुचिस्तानमध्ये बीएलएचा प्रहार, 150 सैनिक ठार आणि रक्तरंजित संघर्ष

Balochistan Attack: बलुचिस्तानमध्ये बीएलएच्या ‘ऑपरेशन हेरोफ २.०’ हल्ल्यात १५० पाकिस्तानी सैनिक ठार, १२ जिल्ह्यांमध्ये गोळीबार व स्फोट, प्रांतात कडक लॉकडाउन, आंतरराष्ट्रीय लक्ष वेधले, CPEC प्रकल्पावर परिणाम होण्याची भीती आहे.

Published by : Dhanshree Shintre

पाकिस्तानचा सर्वात मोठा आणि नैसर्गिक संसाधनांनी श्रीमंत प्रांत बलुचिस्तान सध्या रणांगणात बदलला आहे. गेल्या ३५ तासांपासून सुरू असलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या (BLA) ‘ऑपरेशन हेरोफ २.०’ ने पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणेचे परिपक्व धिंडवडे काढले आहेत. BLA ने दावा केला आहे की, त्यांच्या मजीद ब्रिगेड आणि फतेह स्क्वॉडने १५० हून अधिक पाकिस्तानी सैनिक आणि निमलष्करी दलाच्या जवानांना कंठस्नान घातले आहे. हे हल्ले इतके नियोजनबद्ध होते की, नोशकी, ग्वादर, मस्तुंग आणि पंजगुरसह १२ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी स्फोट आणि गोळीबाराचे धडाके ऐकू येत होते.

या हिंसाचाराला पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांच्या एका जुने विधानाने आणखी रंग दिला आहे. एक वर्षापूर्वी मोहसीन नक्वी यांनी बलुच बंडखोरांना कमी लेखत म्हटले होते की, त्यांच्याशी लढायला लष्कराची गरज नाही, एकच एसएचओ पुरेसा आहे. मात्र, आज तेच बलुच सैनिकांनी पाकिस्तानी लष्कराला घाम फोडला आहे. BLA ने स्पष्ट केले की, त्यांचा संघर्ष फक्त सैन्याशी आहे, सामान्य पोलीस किंवा नागरिकांना लक्ष्य केले जात नाही. नोशकी आणि ग्वादरसारख्या महत्त्वाच्या शहरांतील लष्करी तळांना या हल्ल्यांत लक्ष्य करण्यात आले.

पाकिस्तानी लष्कराने पलटवार करत या हल्ल्यांना ‘फित्ना-अल-हिंदुस्थान’ असे नाव देत भारतावर आरोप केले आहेत. लष्कराच्या दाव्यानुसार, प्रतिहल्ल्यात ९२ बंडखोर मारले गेले. मात्र, माजी लष्करी अधिकारी मेजर (नि.) आदिल राजा यांनी सरकार आणि लष्करावर सडकून टीका केली आहे. लोकमत चोरून सत्तेवर आलेले हे लोक आपली अक्षमता लपवण्यासाठी बाहेरच्या देशांवर बोट ठेवत असल्याचे ते म्हणाले. बलुचिस्तानमधील उठाव हा स्थानिक लोकांच्या असंतोषाचा परिणाम असून, तो दाबता येणार नाही, असे त्यांनी बजावले.

परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या भीतीने बलुचिस्तान गृहमंत्रालयाने संपूर्ण प्रांतात कडक लॉकडाउन आणि निर्बंध लादले आहेत. पुढील महिनाभर मोटारसायकलवर दोन व्यक्ती बसण्यास बंदी, शस्त्र प्रदर्शनावर पूर्ण प्रतिबंध, कारांच्या काचांना काळी फिल्म लावण्यास मनाई आणि सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करून अघोषित आणीबाणी लागू केली आहे. या निर्बंधांमुळे स्थानिक व्यापार आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे.

पाकिस्तानच्या या अंतर्गत संकटाने आंतरराष्ट्रीय लक्ष वेधले असून, बलुचिस्तानमधील स्वातंत्र्य चळवळीला नवे बळ मिळाले आहे. चीनच्या CPEC प्रकल्पावरही या हिंसेत परिणाम होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा