ZP Election Result  
महाराष्ट्र

ZP Election Result : भाजपाची हॅटट्रिक; जिल्हा परिषदेत देवेंद्र–रविंद्र जोडी हिट

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपाने महायुतीतील सहकारी पक्षांपेक्षा आणि मविआ आघाडी पक्षांपेक्षा अधिक जागा जिंकून राज्यातील जनतेचा कौल आपल्यालाच आहे हे परत सिद्ध केले.

Published by : Riddhi Vanne

राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सर्वाधिक जागा पटकाविण्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपाने महायुतीतील सहकारी पक्षांपेक्षा आणि मविआ आघाडी पक्षांपेक्षा अधिक जागा जिंकून राज्यातील जनतेचा कौल आपल्यालाच आहे हे परत सिद्ध केले. या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हीच राजकारणातील आजची जोडी नं. 1 असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि रविंद्र चव्हाण यांच्या नियोजनाच्या बळावर भारतीय जनता पक्षाने राज्यात सर्वाधिक जागा मिळविण्याची अनोखी हॅटट्रिक प्राप्त केली आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या नगर परिषद निवडणूका, त्यानंतर जानेवारीत झालेल्या महानगरपालिका निवडणुका आणि या फेब्रुवारी महिन्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत देवेंद्र आणि रविंद्र या राजकीय पॉवरफुल जोडीने अचूक निवडणूक नियोजन, प्रभावी प्रचार यंत्रणा पद्धती, स्थानिक पातळीवरील पक्षासोबत राज्य पातळीवरील पक्षाचा थेट संवाद आणि समन्वय अशा विविध माध्यमातून भाजपाला उच्च दर्जाची सक्षम पक्ष यंत्रणा उभारली. त्यामुळे स्थानिक नेतृत्वाला शीर्षस्थ नेतृत्वाचा वरदहस्त लाभला आणि धाकही जाणवला. याचा सकारात्मक परिणाम होऊन पक्षाने अनेक ठिकाणी अत्यंत आश्चर्यकारक आणि धक्कादायक विजय नोंदवले. या यशाचे मुख्य शिल्पकार देवेंद्र फडणवीस तर सूत्रधार रविंद्र चव्हाण हे आहेत हे निर्विवादपणे म्हणावे लागेल.

रविंद्र चव्हाण यांना निवडणूक सिद्ध नेता म्हणून ओळखले जाते. ते जमिनीवर वावरणारे आणि कार्यकर्त्यात रमणारे प्रदेशाध्यक्ष आहेत. निवडणुकीत अत्यावश्यक असणारे साम दाम दंड भेद वापरताना विचारधारेच्या धाग्याने कार्यकर्त्यांना आणि मतदारांना जोडणारे असे त्यांचे नेतृत्त्व आहे म्हणूनच दिल्ली आणि नागपूर दोन्ही सत्ताकेंद्रांशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. त्याच बरोबर त्यांना देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आणि सहकार्य कायम मिळतच असते.

थोडक्यात

  1. तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक निकाल: सर्वाधिक जागा भाजपने पटकावल्या.

  2. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती: भाजपाने महायुतीतील सहकारी पक्षांपेक्षा आणि मविआ आघाडीपासून जास्त जागा जिंकल्या.

  3. जनतेचा विश्वास: राज्यातील जनतेचा कौल भाजपच्या बाजूने स्पष्ट झाला.

  4. राजकीय जोडी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची जोडी आजची नं. 1 ठरली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा