आज विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस. अधिवेशनाच्या सुरुवाती पासूनच वाढीव वीज बिल मुद्द्यावरुन भाजप नेते आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
वाढीव वीज बिल मुद्यावर चर्चा घ्या, देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत मागणीवाढीव वीज बिल मुद्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत वाढीव वीज बिल मुद्यावर चर्चा घेण्याची मागणी केली. राज्यात वीज कनेक्शन कापली जात आहेत. कोरोनामुळे संकटात आलेल्या नागरिकांना अडचणीत आणलं जात आहे, असं फडणवीस म्हणाले.
यावर उत्तर देताना ऊर्जा विभागाकडून वीज बिल मुद्यावर चर्चा होत नाही तोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांचं आणि घरगुती ग्राहकांची वीज कनेक्शन तोडणी थांबवली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.