SAMRUDDHI MAHAMARG TRAFFIC ALERT: KEY SECTION CLOSED FOR FIVE DAYS IN AMRAVATI REGION 
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg: महत्त्वाची बातमी! समृद्धी महामार्गावर प्रवास टाळा, ‘हा’ टप्पा पाच दिवस राहणार बंद

Expressway Update: समृद्धी महामार्गावरील अमरावती विभागात गॅन्ट्री कामामुळे २७ ते ३१ जानेवारीदरम्यान काही टप्प्यांवर वाहतूक तात्पुरती बंद राहणार आहे.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सोयीने हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम उभारण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अमरावती विभागात १२ टप्प्यात गॅन्ट्री कामासाठी २७ ते ३१ जानेवारीदरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात दुपारी ४५ ते ६० मिनिटे वाहतूक थांबेल, ज्यामुळे नागपूर-मुंबई वाहिनीवर प्रवास करणाऱ्यांना अडचणी येऊ शकतात.

काम अमरावतीतील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर आणि वाशीममील कारंजा दरम्यान होईल. २७ जानेवारीला पठाणपूर-धामणगाव (साखळी क्र. ११०.४००) येथे मुंबई वाहिनी दुपारी ३ ते ४ आणि नागपूर वाहिनी दुपारी १२ ते १ बंद राहील. धोत्रा-चांदूर रेल्वे (१२५.४००) येथे नागपूर वाहिनी दुपारी ३ ते ४ थांबेल. २८ जानेवारीला खंबाळा-चांदूर (१३०.४००) येथे नागपूर वाहिनी दुपारी ३ ते ४ आणि शेलू-नांदगाव खंडेश्वर (१३४.५००) येथे मुंबई वाहिनी दुपारी १२ ते १ बंद असेल.

काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होईल. या महामार्गावर सतत होणाऱ्या अपघातांमुळे चर्चेत असलेल्या समृद्धीवर आता पेट्रोलपंपांनंतर १६ भव्य उपहारगृहे (फूड मॉल) उभारली जात आहेत. यामुळे वाहनचालकांना थांबण्याची सोय होईल आणि अपघात कमी होतील. महामंडळाने वाहनचालकांना पर्यायी मार्ग आणि वेळेची माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

  • समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमचे काम सुरू.

  • अमरावती विभागात २७ ते ३१ जानेवारीदरम्यान वाहतूक तात्पुरती बंद.

  • काही ठिकाणी ४५ ते ६० मिनिटे वाहतूक थांबवली जाणार.

  • वाहनचालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे महामंडळाचे आवाहन.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा