थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai School ) मुंबईत सहा शाळांचे खाजगीकरण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या दहा वर्षात शाळांच्या पटसंख्येत मोठी घट झाल्याची कारण देत मनपा अख्यतारितील सहा शाळांचे खाजगीकरण होण्याची शक्यता असून जागा 30 वर्षांसाठी व्यवस्थापन संस्थेकडे देण्याची पालिकेची तयारी असल्याची माहिती मिळत आहे.
दहा वर्षात 90 हजार विद्यार्थ्यांनी शाळा सोडली तर 152 महापालिका शाळा बंद पडल्याची माहिती मिळत असून या सहा शाळांमध्ये मालाड येथील कन्या शाळा , माहीम बीएमसी शाळा, मालाड धनजीवाडी शाळा, मालाड येथील एमएचबी उर्दू शाळा , वाकोला बीएमसी शाळा, ठाकूर व्हिलेज बीएमसी शाळांचा समावेश आहे.
महापालिकेच्या मालकीच्या जमिनीवरील शाळांचे दैनंदिन व्यवस्थापन व संचलन खाजगी संस्थांकडे राहणार असून याबाबत निविदा काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Summary
मुंबईत सहा शाळांचे खाजगीकरण ?
जागा 30 वर्षांसाठी व्यवस्थापन संस्थेकडे देण्याची पालिकेची तयारी
या संदर्भात निविदा काढण्यात आल्या