महाराष्ट्र

दहावीचा निकाल १५ जुलैपर्यंत!

Published by : Lokshahi News

अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे राज्यातील दहावीचा निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अंतिम निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर करण्यात येईल, असे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दोन आठवड्यांत म्हणजे जुलैअखेरपर्यंत किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अकरावीसाठी प्रवेश परीक्षा होईल, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

सर्व मंडळांच्या सर्व शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी बंधनकारक आहे. मात्र, प्रवेश परीक्षेत मराठीला स्थान दिलेले नाही. भाषांमध्ये फक्त इंग्रजीचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान इंग्रजी प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा यांसाठी प्रश्नपत्रिकेचे एकच स्वरूप असणार का, याबाबतही संदिग्धता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा