Mumbai  
मुंबई

Mumbai : मोठी दुर्घटना टळली; मुंबई एअरपोर्टवरील धावपट्टीवरच विमानांची टक्कर

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी दुर्घटना होता होता टळली.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Mumbai ) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी दुर्घटना होता होता टळली. मुंबई एअरपोर्टवर धावपट्टीवरच विमानांची टक्कर झाल्याचे पाहायला मिळाले. एअर इंडिया आणि इंडिगो या दोन कंपन्यांच्या विमानांचे पंख एकमेकांना जोरात धडकले.

एअर इंडियाचे विमान मुंबईहून कोईम्बतूरला जाण्यासाठी पुशबॅक घेत होते. त्याच वेळी, हैदराबादवरून आलेले इंडिगोचे विमान लँडिंगनंतर पार्किंगच्या दिशेने सरकत होते याच दरम्यान या दोन विमानांच्या पंख्यांची जोरदार टक्कर झाली.

घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने आणि क्रू मेंबर्सनी लगेच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले. काही वेळ प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. या घटनेत कोणाला कोणतीही दुखापत झाली नसून प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी दुर्घटना

  • धावपट्टीवरच विमानांची टक्कर

  • एअर इंडिया आणि इंडिगो या दोन कंपन्यांच्या विमानांचे पंख एकमेकांना जोरात धडकले

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा