Admin
Admin
लोकशाही स्पेशल

Dr Babasaheb Ambedkar : आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती

Published by : Siddhi Naringrekar

आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. संपुर्ण देशभरात भीम जयंतीचा तयारी सुरु करण्यात आली आहे. या जयंतीला आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती म्हणून ओळखले जाते. आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल रोजी महू म्हणजे आताच्या मध्य प्रदेशातील एका गरीब कुटुंबात झाला होता.

ते भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानुसार ते जागतिक दर्जाचे वकील, समाजसुधारक आणि प्रथम क्रमांकाचे जागतिक दर्जाचे विद्वान होते. यानिमित्त या दिवशी शाळा, कॉलेज, विविध सामाजिक संस्था आणि शासनाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

यानिमित्त या दिवशी शाळा, कॉलेज, विविध सामाजिक संस्था आणि शासनाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सामाजिक कार्यकर्ते, वकील आणि राजकीय कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे आंबेडकर यांना प्रेमाने बाबा साहेब म्हटले जायचे. भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात आणि दलितांच्या हक्कांसाठी उभे राहण्यासाठी त्यांच्या विशेष योगदानासाठी त्यांचे स्मरण केले जाते.

आंबेडकरांचे शिक्षण मुंबई कॉलेज, कोलंबिया विद्यापीठ यूएस, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यूके येथून झाले. परदेशातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट करणारे ते पहिले भारतीय होते. त्यांनी मुंबईच्या विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक म्हणून २ वर्षे काम केले. 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना स्वीकारणाऱ्या समितीचे ते प्रमुख होते. ते व्यवसायाने न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि देशाचे पहिले न्याय आणि कायदा मंत्री होते.

बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या. तसेच महाडच्या चवदार सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्यता विरोधी लढ्याचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली.बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता आदी पाक्षिके, वृत्तपत्रे त्यांनी सुरू केली होती.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...