महाराष्ट्र

मित्रांसोबत मौजमस्ती बेतली जीवावर! एका तरुणाचा मृत्यू

मित्रांसोबत मौजमस्तीसाठी गेलेल्या तरुणाचा बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ठाण्याजवळील पानखंडा गावात ही घटना घडली.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

शुभम कोळी | ठाणे : मित्रांसोबत मौजमस्तीसाठी गेलेल्या तरुणाचा बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ठाण्याजवळील पानखंडा गावात ही घटना घडली. चिराग जोशी असं या 19 वर्षीय तरुणाचं नाव असून तो कळव्यात राहणारा होता. या घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहे.

बुधवारी संध्याकाळच्या सुमारास चिराग आपल्या काही मित्रांसोबत ओवळा पानखंडी गवाजवळ असणाऱ्या एका बंधाऱ्याच्या येथे गेला होता. पावसामुळे बंधाऱ्यामध्ये काठोकाठ पाणी भरले होते. मात्र, चिरागला पोहता येत नव्हते तरीही तो पाण्यामध्ये गेला. बराच वेळ तो बाहेर न आल्याचे मित्रांच्या लक्षात आल्याने चिरागची शोधाशोध सुरू झाली. अखेर रात्री उशिरा ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथकाने आणि अग्निशमन विभागाने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, रात्रीच्य़ा अंधारात शोधकार्य करणे शक्य नसल्याने कार्य थांबविण्यात आले होते.

आज सकाळी ८:३० वाजल्यापासून पुन्हा शोधमोहिम सुरू केली असता चिरागचा मृतदेह बंधाऱ्याच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. सदर मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दरम्यान, चिरागला पोहता येत नव्हते तरी तो पाण्यात कसा गेला याबाबत मित्रांनाही कल्पना नसून याबाबत पोलीस आता पुढील तपास करत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Fake Crop Insurance : नांदेडमधील 'बोगस' पीक विमा घोटाळा उघड; बीडचे 9 एजंट, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावानेही विमा

Saamana Editorial : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी...'; 'सामना'तून सरकारवर साधला निशाणा

Shubhanshu Shukla Axiom 4 : शुभांशु शुक्लानं ISS च्या कक्षेत पूर्ण केला एक आठवडा; सांगितलं पुढील कामाचं नियोजन