महाराष्ट्र

लॉकडाऊन काळात शिक्षकांची 50 टक्के उपस्थिती अनिवार्य

Published by : Lokshahi News

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रसार पाहता औरंगाबादमध्ये 11 मार्च 14 एप्रिल दरम्यान अंशतः लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या काळात प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांची 50 टक्के उपस्थिती व ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहेत. गेल्या काही दिवसापासून शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यातील सर्व शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्यात येतील. परंतू ऑनलाईन कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

10 वी व 12 वीची प्रात्यक्षिक परीक्षा व 8वी साठी आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा ठरलेल्या नियोजना नुसार घ्यावी. 50 टक्के शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून ऑनलाईन अध्यापन करावे. शिक्षकांनी स्टाफ रूम किंवा इतर ठिकाणी एकत्र येऊ नये, असे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?