महाराष्ट्र

भंडाऱ्यात मासेमारी गेलेले 6 तरुण पुराच्या पाण्यात अडकले

मासेमारी गेलेले 6 तरुण पुराच्या पाण्यात नदीच्या मधोमध बेटावर अडकल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी येथील पाथरी येथे घडली आहे.

Published by : Team Lokshahi

मासेमारी गेलेले 6 तरुण पुराच्या पाण्यात नदीच्या मधोमध बेटावर अडकल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी येथील पाथरी येथे घडली आहे. या तरुणांच्या बचावासाठी SDRF चे एक चमू पाचरण करण्यात आले आहे. रात्रीच्या काळोख आणि नदीत पाणी वाढत असल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहे.

पवनी तालुक्यातील पाथरीचे काही मासेमारी करणारे इसम वैनगंगा नदीत मासेमारी करीता गेले होते. नदीपात्रात पाण्याची वाढ झाल्यामुळे तसेच मुसळधार पाऊस होत असल्याने हे सहा जण पाथरी येथील नदीच्या मधोमध असलेल्या बेटावर अडकले.

त्यांना बाहेर काढण्यासाठी भंडारा जिल्हा शोध व बचाव पथक प्रयत्न करीत आहे. मात्र रात्रीचा काळोख असल्याने व नदीचे पात्रात पाणी खूप असल्याने बचाव कार्य करण्यास अडसर निर्माण होत आहे. या सहा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी SDRF चे एक चमू तैनात करण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी