महाराष्ट्र

भंडाऱ्यात मासेमारी गेलेले 6 तरुण पुराच्या पाण्यात अडकले

मासेमारी गेलेले 6 तरुण पुराच्या पाण्यात नदीच्या मधोमध बेटावर अडकल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी येथील पाथरी येथे घडली आहे.

Published by : Team Lokshahi

मासेमारी गेलेले 6 तरुण पुराच्या पाण्यात नदीच्या मधोमध बेटावर अडकल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी येथील पाथरी येथे घडली आहे. या तरुणांच्या बचावासाठी SDRF चे एक चमू पाचरण करण्यात आले आहे. रात्रीच्या काळोख आणि नदीत पाणी वाढत असल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहे.

पवनी तालुक्यातील पाथरीचे काही मासेमारी करणारे इसम वैनगंगा नदीत मासेमारी करीता गेले होते. नदीपात्रात पाण्याची वाढ झाल्यामुळे तसेच मुसळधार पाऊस होत असल्याने हे सहा जण पाथरी येथील नदीच्या मधोमध असलेल्या बेटावर अडकले.

त्यांना बाहेर काढण्यासाठी भंडारा जिल्हा शोध व बचाव पथक प्रयत्न करीत आहे. मात्र रात्रीचा काळोख असल्याने व नदीचे पात्रात पाणी खूप असल्याने बचाव कार्य करण्यास अडसर निर्माण होत आहे. या सहा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी SDRF चे एक चमू तैनात करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा